जीवित हानी टाळणे तसेच अग्नि आणि सुरक्षा यामधील संभाव्य धोक्यासाठी जनजागृती करणे या साठी देशभरात गेल्या २० वर्षापासून कार्यरत असणाऱ्या फायर ॲण्ड सिक्युरीटी असोसिएशन ऑफ इंडिया ( एफएसएआय) च्या नाशिक चॅप्टरचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी नाशिक चॅप्टरचे नवनिर्वाचित अध्यक्ष वरुण तिवारी व सचिव हर्षद भामरे यांनी पदभार स्वीकारला. या पदग्रहण सोहळ्या साठी एफएसएआय चे राष्ट्रीय अध्यक्ष अजित राघवन, माजी राष्ट्रीय अध्यक्ष पंकज धारकर, पश्चिम विभागीय संचालक निमित सेठ हे मान्यवर उपस्थित होते.
2002 मध्ये या संस्थेची सुरवात करण्यात आली. आजमितीला देशभरात 24 चॅप्टरच्या माध्यमातून संस्थेचे कार्य चालते. अग्निसुरक्षा ,जनजागृती, प्रशिक्षण, सामाजिक दायित्व, पर्यावरण तसेच ज्ञानसंवर्धन या क्षेत्रात संस्था कार्य करत आहे. वेगाने विकसित होणाऱ्या नाशिकमध्ये हा चॅप्टर सुरु झाल्याने येत्या काळात नाशिकमध्ये देखील अनेक उपक्रमराबविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
अजित राघवन- राष्ट्रीय अध्यक्ष एफएसएआय
सद्यस्थितीत देशभरात संस्थेचे 8500 हून अधिक सदस्य असून शाळकरी मुलांमध्ये अग्नीसुरक्षेबाबत जनजागृती होण्यासाठी संस्था गेल्या तीन वर्षापासून कार्य करत आहे. या अंतर्गत आजपावेतो सुमारे 4.50 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले असून येत्या दोन वर्षात ही संख्या 10 लाखांपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य आहे असेही त्यांनी नमूद केले.
पंकज धारकर- माजी राष्ट्रीय अध्यक्ष
पदग्रहणानंतर बोलतांना म्हणाले की सुरक्षित नाशिक हे संस्थेचे मुख्य लक्ष्य असून या क्षेत्रात येणाऱ्या नवनविन तंत्रज्ञानाची ओळख नाशिककरांना करून देण्याचा मानस आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या सर्वात मोठ्या टनेलचे काम देखील नाशिकच्याच टीम ने केले असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले.
वरुण तिवारी- नवनिर्वाचित अध्यक्ष
एएफएसआय नाशिक ची कार्यकारणी-
अध्यक्ष- वरुण तिवारी, सचिव- हर्षद भामरे,
सल्लागार- नॉर्बट डिसूझा, किरण चव्हाण, संजय बैरागी, आबासाहेब काळे
सदस्य- आनंद दीक्षित संजीव जगताप, दिपक दंडगावकर, श्रुतकिर्ती कर्वे-बेडेकर, सई मोने-पाटील, गजेंद्र जगताप, सागर देवरे, किरण नवले, एम. एल. अग्रवाल, अनिल शिंपी, अमित पारसे, अभिषेक अयाचित, माधुरी कोतवाल
पदग्रहण समारंभानिमित्त सुरक्षित नाशिक या विषयावर आयोजित चर्चासत्र
आज एकविसाव्या शतकात तंत्रज्ञान जरी खूप पुढे गेले असले तरी समाजातील विविध घटक विशेष करून मुली, महिला, लहान मुले हे असुरक्षित आहेत. सोशल मीडिया, मोबाईल गेमिंग यामुळे तसेच तंत्रज्ञानाच्या आधारे होणाऱ्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. शहरी व ग्रामीण भागातील गुन्ह्याचे स्वरूप यामध्ये थोडाफार फरक जरी असला तरी त्याची दाहकता कायम आहे. यामुळे पालक व मुलांत सुसंवाद असणे, आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या घटनांबाबत सतर्कता बाळगणे, पालकांनी मुले व मुली यामध्ये समानता ठेवणे हे भविष्यातील सुरक्षित शहरांसाठी आवश्यक आहे.
प्रत्येकाला स्वसंरक्षणाच्या ज्ञानासोबतच सुरक्षेसाठी असणारी आधुनिक डिव्हाइसेस आता गरजेची आहेत. घरातील सुरक्षेसाठी गॅस गिझर चा वापर शक्यतो टाळून बाकी उपकरणांची नियमित देखभाल देखील आवश्यक आहे.
या चर्चासत्रात पोलीस उप निरीक्षक कविता फडतरे, आर्कि. अर्चना पेखळे, डॉ चेतना दहिवलकर, आर जे वैष्णवी, भोपाळ महानगरपालिकेचे साजिद खान, एफएसएआय गुजरात चाप्टरच्या अमी शेठ सहभागी झाल्या होत्या . या सत्राचे समन्वयक म्हणून राजेश शिर्के यांनी काम बघितले .
कार्यक्रमाला एफएसएआयचे सदस्य, विविध अन्य संघटनांचे प्रतिनिधी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.